समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

उद्दिष्ट :

दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनु. जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी व मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.

लाभाचे स्वरूप :

१) सदर योजना 100% शासन अनुदानित आहे.

२) अनु. जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखाली भुमिहीन कुटूंबाला 4 एकर कोरडवाहु (जिरायत) जमिन किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.

अटी व शर्ती :

१) अर्जदार हा अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा.

२) अर्जदार हा दारिद्रय रेषेखालील व भुमिहीन शेतमजुर असावा.

३) अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंत असावी, विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांना प्राधान्य देण्यात येते व अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनु. जातीचे अत्याचार ग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येते.

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर